शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

घोड्यांवर चर्चा...

ते तिघे उन्हात बसले होते
आणि घोड्यांवर चर्चा करत होते.

तो सुंदर आहे - एक म्हणाला
चूक - दुसऱ्याने खोडून काढले
तो फक्त सामर्थ्यवान आहे - खूपच सामर्थ्यवान

तिसरा जो आतापर्यंत गप्प होता
हळूच म्हणाला - तो इतका सामर्थ्यवान आहे
की त्याच्यावर चर्चा होऊ शकत नाही.

का नाही होऊ शकत - पहिला ओरडला
जरूर होऊ शकते - दुसऱ्याने दुजोरा दिला

तिसरा गप्प होता
किंबहुना म्हणावं लागेल खुश होता.
तो विडीची राख झाडत म्हणाला -
पण घोडा कुठे आहे?

तर काय झालं?
घोड्यावर चर्चा तर होऊ शकते
पहिला म्हणाला

होऊ शकते पण मला वाईट वाटतं
मी अनेक वर्ष घोडा नाही पहिला -
तिसऱ्याच्या बोलण्यात एक वेगळीच वेदना होती

घोडे कमी होत चालले आहेत
पहिला म्हणाला

ठीक - पण हाच तर प्रश्न आहे
की घोडे का कमी होत चालले आहेत
दुसऱ्याने विचारलं

ते विकले जातात - पहिला म्हणाला

पण कोण  विकत घेतं एवढे सगळे घोडे
याची संख्या कुठेतरी असेलच -
दुसऱ्याचा प्रश्न तयार होता.

आहे - पण तो आपल्याला मिळू नाही शकत
पहिल्याने ‘आहे’वर जोर देत म्हटलं

का? - का नाही मिळू शकत?-
दुसरा थरथरत होता.

कारण घोडे संख्यांना चिरडून टाकतात
पहिल्याने सांगितलं
पहिल्याचा आवाज इतका धीमा होता
जणू तो समोरच्याशी नव्हे
स्वतःशीच बोलत असावा.

तिसरा जो आतापर्यंत गप्प होता
एकदम ओरडला - मित्रांनो
एक दिवस आकडे उठतील
आणि घोड्यांना चिरडून टाकतील.

त्यानंतर बराच काळ
कोणतीच चर्चा झाली नाही. 



मूळ कविता : धूप में घोडे पर बहस
मूळ कवी : केदारनाथ सिंह

मूळ भाषा : हिंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा