शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

स्वातंत्र्य ५

काय दिवस आले आहेत पहा,
आधी काय लिहावं हे
सांगितलं जात होतं,
मग कसं लिहावं ते
सांगितलं जाऊ लागलं
हळूहळू का लिहायचं ते
अपोआप कळायला लागलं,
आता काय लिहावं, कसं लिहावं हे
सांगणारेच शिकवू लागले आहेत
काय लिहू नये, कसं लिहू नये,
आणि आडूनआडून सुचवताहेत
कुणा-कुणाविरुद्ध लिहू नये,
खरंच आता वाटतंय

लिहूच नये...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा