शुक्रवार, ३१ ऑक्टोबर, २०१४

संपला नाहीये रणसंग्राम

सांगितला होता ज्यांनी
लक्ष्मीदर्शनाचा मुहूर्त
ज्यांनी आधीच दिले सल्ले
खाण्या-पिण्याचे आणि ठेऊन घेण्याचे
त्यांची कड घेतली नाही
म्हणून केली जिवंत जाळपोळ
तेच घेताहेत आज शपथा
जनतेचे वाली म्हणून
लोकशाहीचा उत्सव झाला
घरोघरी लक्ष्मी आली
निकाल तर लागून गेले
पण खरी परीक्षा आता सुरु झाली
संपला नाहीये रणसंग्राम
इतक्यात नका उसंत घेऊ,
सरकारच्या कारभारावर
सजगपणे लक्ष ठेऊ....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा