मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

लोकशाहीची ऐशीतैशी



मुक्या झाल्या आहेत लेखण्या
कोरे पडले आहेत ताव,
बोलणारे तर बोलत राहतात
खाऊन जातात भाव...
खून झालाय लोकशाहीचा
त्राता नाही उरला कुणी,
स्वातंत्र्याचं तर नावच नको
सारीच इथे आणीबाणी...
झुळझुळणारे झरेच नाहीत
पण आलाय महापूर मद्याचा
दसरा गेला उलटून तरी
सुकाळ येथे रावणांचा...
कुणाच्या घरी फ्रायपॅन
तर कुणाकडे रोकड रक्कम
बालंट आलं अंगावर तर
पाठीशी पक्ष भक्कम...
काय बोलावं काही कळेना
मनात दाटून येते भीती
युती-आघाड्यांचं सोडून द्या
सत्तेसाठी तुटतील नाती...
पाहिली लोकशाहीची ऐशीतैशी
तरी थोडा धीर धरा
मनात ठेऊन कर्तव्यभाव

डोळसपणे मतदान करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा