गुरुवार, २६ जून, २०१४

पाऊस आठवणीतला


निरभ्र आकाश
आले मेघांनी भरून,
त्यात माझे मन
गेले नकळत गुंतून
बरसती ते मेघ
झाले काळजाचे पाणी,
पुन्हा ओठात रुतली
तीच अंतरीची गाणी

आतल्या आत न जाणो
काहीबाही धुमसते,
रुक्ष नजर फिरता
जग भकास भासते

आसपास नाही कुणी
कुणा शोधती लोचने,
कुणी ऐकणारे नाही
परि साद घातली मनाने...

मनी साचून राहिल्या
त्याच पावसाच्या सरी,
अडले पाऊल माझे
फिरले पुन्हा माघारी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा